अमरनाथ संघर्ष समिती
जम्मू, दि.२७ - जम्मू येथे अतिरेक्यांनी केलेल्या पाच जणांच्या हत्येच्या घटनेमुळे अमरनाथ बोर्डाची जमीन परत मिळविण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या संघर्ष समितीने आपली आजची रॅली रद्द केली.
याबाबत माहिती देताना श्री अमरनाथ यात्रा संघर्ष समितीचे नेते नरेश पाधा यांनी सांगितले की, जम्मू क्षेत्रात सातत्याने कालपासून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. त्यातूनच अतिरेक्यांनी पाच जणांना ठार केल्याने या क्षेत्रातील स्थिती अतिशय संवेदनशील झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही आम्हाला आजची रॅली रद्द करण्याची विनंती केली होती. एकंदर सामाजिक स्थिती लक्षात घेऊन समितीने परेड ग्राऊंडवरील रॅली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप पुढील रॅलीची तारीख ठरलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा