तब्बल 56 वर्षांनंतर कुस्तीत भारताला कास्य पदक
बीजिंग, दि. 20 कुस्तीमधील फ्री स्टाईल प्रकारातील 66 किलो वजनी गटात आज भारताचा अव्वल मल्ल सुशीलकुमार याने कास्य पदकासाठी झालेल्या लढतीत कझाकिस्तानच्या स्प्रिदोनोवला याला लोळवले आणि भारताच्या झोळीत एका पदकाची भर टाकली. खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 56 वर्षांनंतर आज भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आणि कुस्तीच्या इतिहासातील अर्धशतकातील पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला.
दरम्यान, आज सकाळी युक्रेनच्या आंद्रे स्टॅडनिकने भारताच्या सुशीलकुमारचा सहज पराभव केला. त्यामुळे कुस्तीतील सुवर्ण व रौप्य पदकाच्या भारताच्या आशा मावळल्या. मात्र कांस्य पदकाच्या लढतीत सुशीरकुमारने वेगवान हालचाली करत कझाकिस्तानच्या मल्लावर विजय मिळविला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा