नवी दिल्ली, दि.२५ : कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारने गेली साडेचार वर्षे दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. असेच कायम राहिले तर देशाची सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा देतानाच, ""आता तरी मवाळ धोरण सोडा,'' अशी सूचना भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांनी केंद्राला केली आहे.
मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेवून या सरकारने दहशतवाद्यांबाबत नेहमीच मवाळ भूमिका घेतली आहे. संसद हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार मोहंमद अफजल गुरू याचा बचाव करण्यासाठी सरकारची सुरू असलेली धडपड याचेच प्रतीक आहे. देशात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. पण, हे सरकार अजूनही बघ्यांची भूमिका पार पाडत आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याचा आमचा निर्धार अशा हल्ल्यांनी डळमळणार नाही, असे नेहमीचेच वक्तव्य करून हल्ल्यांचा निषेध करण्यापलीकडे या सरकारने दुसरे काहीच केले नाही, असे राजनाथसिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा