पुरी, (ओरिसा) दि. ४ : येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेत आज चेंगराचेंगरीमुळे सहा भक्तांचा मृत्यू झाला कित्येक जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मृत महिला भुवनेश्वर येथे राहणाऱ्या आहेत. काही मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांच्या रथांचे दर्शन घेताना एकमेकांचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक-एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा