पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मार्च महिन्यात राज्य शालान्त शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षांचे निकाल उद्या, शनिवार, १० मे रोजी दुपारी ३.३० वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. शालान्त शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांनी ही माहिती दिली. निकाल दुपारी ३.३० वाजल्यापासून मंडळाचे संकेतस्थळ व "एसएमएस'द्वारे हे निकाल परीक्षार्थींना उपलब्ध होतील. गोवारिझल्ट, इंडियारिझल्ट, रेडीफ, सिफी आदी संकेतस्थळांवर हे निकाल उपलब्ध असतील.
"एसएमएस'द्वारे बीएसएनएल, एअरटेल, आयडिया, व्होडाफोन व टाटा या मोबाईलवर निकाल उपलब्ध असेल. मोबाईलद्वारे आपला निकाल जाणून घेण्यासाठी ५७३३३, ५४५४५ व ५४२४२ या क्रमांकावर उमेदवार दूरध्वनी करू शकतात. "एसएमएस' करण्यासाठी "मेसेज'मध्ये जाऊन जीबी१२ (स्पेस देणे) त्यानंतर आपला आसन क्रमांक देऊन बीएसएनएल ग्राहकांनी ५६५०५, व्होडाफोन ५५४५६ तर टाटाच्या ग्राहकांनी ५८२८२६ या क्रमाकांवर मेसेज पाठवावा, अशी माहिती शालांत मंडळातर्फे देण्यात आली.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा