Sunday, 23 March 2008

पावसाचा पिकांना दणका, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवे

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): राज्यात भर शिमगोत्सवाच्या धामधुमीत अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे. याचा जबर फटका बसला आहे तो राज्यातील शेतकऱ्यांना. काजू, आंबे, मिरची, कांदे आदी नगदी पिके हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यांत आसवे जमा झाली आहेत.
कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही दुपारपासून राज्यातील बहुतेक सर्वच भागांत हजेरी लावून लोकांची दाणादाण उडवली. उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर व भर शिमगोत्सवाच्या सुरुवातीला अशा प्रकारचा पाऊस झाल्याचे आपण कधीच पाहिले नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरी भागांतील काही ज्येष्ठ शेतकऱ्यांनी दिली.
शहरांतील लोकांसाठी हा पाऊस काही अंशी दिलासादायी ठरला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी त्याने पळवले आहे.
या पावसामुळे काजू उत्पादन नष्ट झाल्याचे सांगून यंदा राज्यात खूपच कमी असलेल्या आंब्याच्या पिकावरही नांगर फिरला आहे. या पावसामुळे वायंगण, पुरण शेती, मिरची, कांदा, वाली, हळसाणे आदी पिकांची जबर हानी झाली आहे. पावसामुळे शेतात पाणी भरले आहे. काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी रुजवलेले पीक पाण्याखाली गेले आहे. काजूपासून दारू तयार करण्याच्या भट्ट्याही उघड्यावरच तयार केल्या जातात. या पावसामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नगदी पिकांवर आपल्या वर्षभराचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठीच आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. सरकारला याकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. सरकारकडून आपल्याला त्वरित आर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस कोसळत आहे. आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ही माहिती वेधशाळेच्या सूत्रांनी दिली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा