पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): वृत्तपत्रांनी सकारात्मक बातम्या द्याव्यात आणि निकोप समाजमन घडवावे,अशी अपेक्षा कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश श्रीब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली. आजकाल भडक व गुन्हेगारीच्या बातम्यांना प्राधान्य देण्याकडे वृत्तपत्रांचा कल दिसतो. "गोवादूत'याला अपवाद ठरत असल्याचे सांगून या नव्या वृत्तपत्राची वाटचाल एखाद्या प्रस्थापित वृत्तपत्राच्या तोडीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्कृती संवर्धन व नीतिमत्ता यांना प्राधान्य देणारे एकमेव वृत्तपत्र असा त्यांनी "गोवादूत'चा गौरव केला. आज वाढदिनी त्यांना "गोवादूत'परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी आपली प्रांजळ मते व्यक्त करून आपल्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा