Friday, 29 February 2008

रेल्वे रूळावर
१६ जण ठार

सूरत, दि. २८ - सुरत जिल्ह्यातील उधना रेल्वे स्टेशनजवळील ककराखाडी पुलावर काल बुधवारी रात्री उशिरा दोन महिलांसह १६ जण ठार झाले. अन्य तीन जखमींना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास काही लोक रूळ ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत असता, त्याचवेळी वेगाने आलेल्या ट्रेनखाली ते चिरडले गेले, असे रेल्वे पोलिस निरीक्षक एच. एम. पटेल यांनी सांगितले.
ठार झालेले हे लोक उत्तर प्रदेशचे असल्याचे सांगितले जात आहे. मृतकांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात नेमका कोणत्या ट्रेनमुळे झाला हे अद्याप समजले नसले तरी मागून येणाऱ्या सूरत-मुंबई फ्लाईंग राणी एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरला रूळावर काही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेले दिसून आले. त्याने लगेच या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले होते.
मृतकांची ओळख पटली नसली तरी हे सर्व लोक एकाच कुटुंबातील असावेत, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा