Saturday, 21 May 2011

शिक्षणमंत्र्यांना तात्काळ पदच्युत करा : दामू नाईक

पणजी, दि. २०(प्रतिनिधी): राज्यातील शिक्षण खात्यात सर्वत्र सावळागोंधळ सुरू असून विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग पेचात सापडले आहेत. या सर्व कारभाराला शिक्षणमंत्र्यांची निष्क्रियताच उघड झाली असून त्यांना तात्काळ या पदावरून हटवावे, अशी जोरदार मागणी भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केली आहे.
गोवा शालांत मंडळातर्फे घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात बराच गोंधळ घालण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अक्षम्य चुका झाल्याचे आढळून आल्याने सर्व गुणपत्रिका परत मागवून पुढील आठवड्यात नव्या गुणपत्रिका जारी करण्याचे मंडळाने ठरवले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांत चिंतेचे वातावरण पसरले असून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना या चुकीचा फटका बसणार आहे. एमबीबीएस व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठीची अंतिम मुदत २५ मे २०११ आहे. या प्रवेशांसाठी बारावी परीक्षेतील ५० टक्के गुण व उर्वरित ‘सीईटी’ परीक्षेतील कामगिरी ग्राह्य धरली जाते. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना सुधारीत गुणपत्रिका पुढील आठवड्यात देण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, असा सवालही आमदार नाईक यांनी केला. शिक्षण खात्याच्या गोंधळी कारभारामुळेच गोव्यातील विद्यार्थ्यांची ‘बीट्स पिलानी’ संस्थेतील प्रवेश परीक्षेला बसण्याची संधी हुकली, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
शिक्षण खात्यातील या एकूणच परिस्थितीला कोण जबाबदार, असा सवाल करून सरकारने तात्काळ गोवा शालांत मंडळ बरखास्त करून शालांत मंडळाची पुनर्रचना करावी व या गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही दामोदर नाईक यांनी केली आहे.
बारावीच्या निकालाचा घोळ कमी म्हणून की काय दुसरीकडे पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वंच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आदेश देणारे शिक्षण खात्याचे परिपत्रकही वादात सापडले आहे. या परिपत्रकांत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली नसल्याने त्याविरोधात मुख्याध्यापक, व्यवस्थापन व प्राचार्य संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी इतर मागासवर्गीयांना १९.५ टक्के आरक्षण देण्याचे स्पष्ट आदेश असताना त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे प्रकारही समोर आले आहेत. हा प्रकार शिक्षण खाते व समाज कल्याण खात्याच्या नजरेस आणून दिला आहेच व रीतसर तक्रारही नोंदवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांवरून शिक्षण खात्याचा कारभार पूर्णपणे ढासळल्याचेच उघड होते. शिक्षणाचे तीन तेरा वाजले असताना आपले शिक्षणमंत्री मात्र बेकायदा विदेशी चलन तस्करी प्रकरणांत गुंतले आहेत व त्यांना सक्तवसुली खात्याकडून दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षणमंत्र्यांना जराशी सुद्धा नीतिमत्ता असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल, असा टोलाही आमदार दामोदर नाईक यांनी हाणला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित शिक्षणमंत्र्यांना डच्चू द्यावा व तात्काळ या प्रकरणी हस्तक्षेप करून विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गांत पसरलेला गोंधळ दूर करावा, अशी मागणीही यावेळी दामोदर नाईक यांनी केली.

1 comment:

  1. We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the

    most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi

    offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


    modeling agencies in Delhi
    modeling agencies
    modeling jobs
    modeling auditions
    model coordinators
    modeling jobs in Delhi

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा