Tuesday, 7 October 2008

२० सुशिक्षित अतिरेक्यांना मुंबई पोलिसांनी पकडले

नवरात्रोत्सवात होणारे बॉंबस्फोट टाळले
मुंबई, दि. ६ : सध्या अतिशय उत्साहात मुंबईत सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात बॉंबस्फोट घडवून रंगाचा बेरंग करण्याचा आणि लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा अतिरेक्यांचा डाव मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. पुणे, सुरत, हैदराबाद आणि अन्य अनेक ठिकाणी छापे घालून आणि २० अतिरेक्यांना अटक करून मुंबई पोलिसांनी - मुंबई ही अतिरेक्यांच्या बापाची नाही - हा संदेश जगभर पाठवला आहे. बॉंबस्फोटांपूर्वी सर्व न्यूज चॅनल्सना स्फोटांबद्दल माहिती देणारे ई-मेल पाठविण्याचे काम करणाऱ्या चौघा अतिरेक्यांचा यात समावेश आहे.
पोलिस आयुक्त हसन गफूर, सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी पकडलेले आतंकवादी उच्चशिक्षित असल्याचे आज भरगच्च पत्रकार परिषदेत मुद्दामहून निदर्शनास आणून दिले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला मन्सूर पीरभाई हा संगणक अभियंता आहे. मोहमम्द शेख हा शिक्षक असून कॉल सेंटरमध्येही फावल्या वेळात तो काम करीत असतो. ईमेल बनविणे, पाठविणे हे त्याचे काम असते. असिफ शेख हा यांत्रिकी अभियंता असून ईमेलद्वारा विशिष्ट लोकांना धमक्या देण्याचे गांभीर्यपूर्वक काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते. अनिस सय्यद याने सुरत, हैदराबाद येथे बॉंब ठेवण्याचे कर्तृत्व दाखविले होते. अकबर चौधरी याने हेच काम सुरत आणि हैदराबादमध्ये केले होते. फैजल रेहमान दुराणी उपाख्य सलाउद्दीन बॉंब बनवीत असे. मोहम्मद असिफ हा देखील संगणक अभियंता असून तो बॉंबचे टायमर सिद्ध करून ते बॉंबवर बसविण्याचे काम करीत असे.
हे सर्व आतंकवादी नवरात्र उत्सवात जागोजागी बॉंबस्फोट घडवून आणण्याची सिद्धता करीत असताना आम्हाला वेळीच माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे तातडीने धावपळ करून मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे असे हसन गफूर यांनी सांगितले.
हे पकडलेले आतंकवादी जर उच्चशिक्षित आणि सुस्थापित असतील तर मुसलमान मागास, अशिक्षित आणि दरिद्री असल्यामुळे आतंकवादाकडे वळतात हा युक्तिवाद तात्पुरता बाजूला ठेवून आतंकवादाच्या मूळ कारणाकडे आपण वळले पाहिजे अशी प्रतिक्रिया हिंदू मानवाधिकार मंचचे धर्मेंद्र मुदलियार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या निर्मितीचे कारस्थान लंडनमध्ये सुशिक्षित मुसलमानांनी रचले होते. हे माहीत होऊनही त्यापासून योग्य तो बोध घेण्याचे बौद्धिक आळसामुळे हिंदूंनी टाळले. ती चूक आता सुधारली नाही तर दुसऱ्या फाळणीचे दायित्व हिंदूंवरच येईल असे म्हणणे चूक ठरेल काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making

    Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा