श्रीनगर, दि. २३ : फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या जहाल गटाने केलेल्या बंदच्या आवाहनानंतरही परिस्थिती आटोक्यात असल्याने काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांमध्ये लागू असलेली संचारबंदी प्रशासनाने आज पूर्णपणे उठवली आहे.
आज सकाळपासूनच खोऱ्यातील जनजीवन पूर्णपणे सुरळीत असून, अजूनपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे पोलिस खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. असे असले तरी श्रीनगर शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या लाल चौक भागातील सर्व दुकाने आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. खोऱ्याच्या इतर भागातील आर्थिक व्यवहार सामान्यपणे होत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सयद अली शाह गिलानी यांच्या जहाल गटाने आंदोलनाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतरही अनेक खाजगी आणि सरकारी वाहने खोऱ्यातून ये जा करत आहेत. सार्वजनिक परिवहन सेवेच्या गाड्या मात्र आज रस्तावर उतरलेल्या नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.
Sunday 24 October, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment