Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 7 August, 2010

खनिज वाहतूक सावर्शेत रोखली

अन् ट्रक माघारी परतले
वाळपई, दि. ६ (प्रतिनिधी): बेकायदा खनिज वाहतूक सत्तरी तालुक्यात फोफावत असतानाच आज रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सावर्शे येथून होणारी वाहतूक स्थानिकांकडून रोखून धरण्यात आली. कोठंबी ते पाळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पुन्हा वाहतूक न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना सोडले व ट्रक पुन्हा माघारी वळवण्यात आले.
यावेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे ३ ते रात्री १२ दरम्यान येथून क्षमतेपेक्षा जास्त खनिज भरलेल्या ट्रकांतून अविरत वाहतूक सुरू असते. सावर्शे पुलावरून १६ टन क्षमतेच्या वाहतुकीला परवानगी असताना त्याहून अधिक प्रमाणात बेदरकार वाहतूक केली जाते. या मार्गावरून खनिज वाहतूक करण्यासाठी परवानगी नसल्याचे काहींनी यावेळी बोलून दाखवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्यांना न जुमानता वाहतूक बंद करण्याची मागणी लावून धरली. शेवटी ट्रकांना आल्या वाटेने परत जाणे भाग पडले. पुन्हा बेकायदा ट्रक वाहतूक सुरू झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी स्थानिकांनी दिला.

No comments: