Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 June, 2010

कणकवलीजवळ गोव्याच्या बसला

भीषण अपघात; ६ जण जागीच ठार

-राऊळ पतीपत्नी मुलासह ठार
-३२ जखमींमध्ये गोव्याचे चौघे


सावंतवाडी, दि. ११ (प्रतिनिधी) - मुंबई- गोवा महामार्गावर गुरूवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कणकवलीजवळील साळीस्ते येथील अवघड वळणावर लक्झरी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात वेर्ले (सावंतवाडी) येथील राऊळ कुटुंबातील तिघांसह सहा जण जागीच ठार झाले असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्यात बस चालकासह गोव्याच्या चौघांचा समावेश आहे.
सागर गंगाराम सोनावणे (१९, रा. आम्रपाली जि.ठाणे), बाबूराव हरी पालव (४५, इन्सुली), प्रथमेश जगन्नाथ खोर्जुवेकर (२०, साईलवाडा, सावंतवाडी), तसेच वेर्ले येथील सुनील वासुदेव राऊळ (४० ), पत्नी सुषमा सुनील राऊळ (३५) व मुलगा हर्षद सुनील राऊळ (१०) हे सहा जण अपघातात जागीच ठार झाले.
जखमींपैकी बारा जण गंभीर आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डायना लक्झरी बस (जी.ए.०७.एफ.०२७३) साळीस्ते येथील वळणावर आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून सव्वा अकराच्या सुमारास झाडाला आदळून अपघात झाला. जोरदार झाडावर बसलेल्या धडकेने गाडीतील प्रवाशांनी किंकाळ्या ठोकल्या. घटनास्थळी प्रचंड हलकल्लोळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच जखमींना मदत कार्य करण्यासाठी स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
बसचा चालक झेवियर जॉन पॉल (४०, हडफडे, गोवा), आशिक अली (१८, गोवा), नीलेश वायंगणकर(३८, गोवा), मनी रेड्डी (३२, पणजी), जस्मीन कौर (४८, जबलपूर), मनिष रमाकांत परब(३४ रा. मळगाव), शुभदा बाबूराव पालव (४६, इन्सुली, सध्या मुंबई), ऑगस्टिन डिकॉस्टा (४८,कुर्ला मुबई), अन्नपूर्णा आमरे (५५, उभादांडा, वेंगुर्ले), गल्लीसिंग कृपालसिंग (३८, रा. जबलपूर), हरिष बाबूराव पालव (२२, मालाड, मुंबई), संदेश विष्णू शिरोडकर(१९, मळगाव), हासिम मलिक (४८, उत्तर प्रदेश), संजयकुमार यादव (३०, दहिसर), नौशाद अंदारी (२५, उत्तर प्रदेश), मोहम्मद निजामुद्दीन अदारी (२९, बिहार), शाहरूख खान (१६, मुंबई), सुष्मिता बाबूराव पालव (१५, मालाड), मीना रेवंडकर (३३, विरार), ऋतिक रामचंद्र ठेंबे (१३, पुणे), धीरेन रयंतीलाल पिराना (३६, बोरवली), आशिष हुसेन शेख (७, नेरूर, मुंबई), सुहेश कथ्थप( ३०, उत्तर प्रदेश), सुप्रिया सुर्यकांत तळकर (४३ पार्ले), सिद्धेश सुर्यकांत तळकर (९ पार्ले), शहाजान हुसेन शेख (७ नेरूर मुंबई), विशाल गुप्ता (२२, बिहार), राजन यशवंत देसाई २५, ओझरम), वनिता अजय सावंत (३४ सांताक्लॉज), पवनकुमार चिंतामणी निशार (३२ बिहार), दत्तजीत कृपालसिंग (५१, जबलपूर) आदी जखमींपैकी १२ गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती लक्झरीचा चालक झेवियर जॉन पॉल याने कणकवली पोलिसांना दिली आहे. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक मदत कार्यासाठी धावून गेले. स्थानिकांच्या साहाय्याने खिडकीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.

No comments: